Saturday, 3 December 2016

नोटबंदी

माझ्या लेखणीतुन.......


निर्णय नोटबंदीचा.....*
नोटबंदीचा निर्णय झाला आणि सर्वप्रथम मला आठवण झाली ती श्रीमान रतनजी टाटा यांची. त्यांचे वाक्य मी आवर्जुन या ठीकाणी लिहीतोय..... *मी थेट निर्णय घेतो, तो चुक की बरोबर याचा फारसा विचार करत नाही पण निर्णय घेतला की त्याच्या परिपूर्णतेसाठी माझे अथक प्रयत्न चालु असतात.* कोणताही निर्णय घेतला की त्याप्रमाणे नियोजन करणे गरजेचे असते आणि त्याच्या पुढची पायरी ती म्हणजे त्याची अंमलबजावणी. नोटबंदी निर्णय फक्त आम्हाला दिसला पण त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरलंय..... मी टिका करत नाही. घेतलेला निर्णय हा स्वागतार्य आहेच पण.. पुर्ण नियोजनाच्या आधारे काही प्रमाणात का होईना झालेला त्रास नक्कीच कमी करता आला असता.... नोटबंदीनंतर काही टीकाकार थेट पंतप्रधानांवर निषाणा साधु लागले. टिकाकारांचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट करा ते त्यातुन वाइटच शोधुन काढणार... असो.... प्रामाणिक पणे सांगायचे झाले तर सध्याचे पंतप्रधान हे इतरांच्या तुलनेत नक्कीच चांगले आहेत... आणि प्रत्येक वेळि   टिका करुन चालत नाही *एखादी गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर बरोबर काय आहे हे आपल्याला सांगणे जरुरी आहे नुसतं चुका काढणे योग्य नसतं*... आपल्याला जर पंतप्रधान चुकिचा वाटत असेल तर मला तर असं वाटतं सध्याच्या राजकारणात पर्यायी पंतप्रधान शोधणे अवघडच आहे. असा एकही व्यक्ति नाहीए जो पंतप्रधान या पदाला साजेसा आहे. मग जर एखाद्या गोष्टीला पर्याय च नसेल तर जी आहे ती चांगली कशी होईल या दृष्टिने विचार करुन तसा प्रयत्न करायला हवा.... सध्याच्या पंतप्रधानांचा विचार करता मनात कुठेतरी विश्वास निर्माण होतो की हा माणुस काही तरी बदल नक्की घडवुन आणेल...  सगळ्यात महत्वाचे मी मोदी भक्त नाही त्यांचा पक्ष कोणता याच्याशी काहिएक देणघेणे नाही आणि आरएसएस शी माझा तिळमात्र संबंध नाही.... मोदी जी एक व्यक्ति म्हणुन मी त्यांचा आदर करतो आणि काही तरी चांगले घडउन आणतील अशी अपेक्षा बाळगतो....
.
         आपला हितचिंतक
            निळकंठ तांबे
             ९४०४ ७७ २२ ००