Wednesday, 14 September 2016

धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय


धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय.....??? यावर चिंतन करायला लावणारि एक संकलित पोस्ट... . लहानपणापासून आपल्या समाजात परंपरेचे अंधश्रध्देचे, देवाधर्माचे इतके डोस पाजले जातात की, ती व्यक्ती मोठी झाल्यावर त्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेली असते. एखाद्या अमली पदार्थासारखा हा विषय त्यांच्या मनात आणि शरीरात भिनला जातो. ते स्वत: काही विचारच करू शकत नाहीत कारण त्यांना ह्या गोष्टीची बाबा, बूवा, साधू, महाराज तसेच धर्मवेडे यांनी इतकी भिती घातलेली असते की, इकडे आड तिकडे विहीर,धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी बिचाऱ्यांची अवस्था होते. अशा परीस्थितीतून तुमच्या आमच्या सारखा विचारांनी त्या बुरसटलेल्या संस्कारांवर मात करून एखादाच बाहेर पडू शकतो . पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावरही त्यांना धर्माच्या कचाट्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते; एवढे brainwashing त्या अजाणतेपणी झालेले असते. म्हणून मूल वाढवतांना त्याला जरी सर्व धर्मांची माहीती दिली, तरी त्याच्यावर आपल्याच धर्माचे रोपण करण्याऐवजी सज्ञान होईपर्यन्त विचार करायला वाव द्यायाला हवा. आणि तदनंतर त्यालाच ठरवू द्यावे कोणत्या धर्माचा स्विकार करायचा वा निधर्मी राहायचे ते.ह्यालाच व्यक्ती स्वातंत्र्य देणे मानतात. हेच खरे पालकत्व असे मला वाटते.

No comments:

Post a Comment