माझ्या लेखनीतुन....
जगाला युद्ध नको बुद्ध हवा...
.
काश्मीर येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाना *भावपूर्ण श्रद्धांजलि.* मानाचा मुजरा आणि सलाम त्यांच्या शौर्याला....
एकंदरीत या घटनेमुळे देशातील व सर्व राज्यातील वातावरण ढवळुन निघालेले आहे. गल्लीपासुन दील्लीपर्यंत चर्चा झाली आणि पुन्हा एकदा आमचे सर्वांचे देशप्रेम उफाळुन आले.
एरव्ही आम्ही एकमेकांवर कुरघोड्या करत असतो, जातीवाद करत असतो, पण त्या निमित्ताने दोन मिनटासाठि का होइना पण आमची देशभक्ति जागृत झाली. आम्ही भारतीय आहोत याची जाणीव झाली.
मग नेहमीप्रमाणे आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा *मुसलमान चलेजाव* चा नारा घुमु लागला. आणि 'पाक'भावना जागृत झाल्या..... घरबसल्या आम्ही देशभक्ति ची भाषा बोलु लागलो, पाकिस्तान ला शिव्या हासडत बसलो पण कुणालाही वाटलं नाही कि आपण हि स्वातंत्र्य सैनिक होउन देशासाठी प्राणार्पण करावं. नाहीं वाटणार, कारण मरणाला प्रत्येक जण घाबरतो *दुस-याचा प्राण गेला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे.* असंच प्रत्येकाला वाटत असते.
आराम खुर्चीत बसुन पाकिस्तान ला धडा शिकवण्याची गोळ्या घालण्याची भाषा आम्ही सहज बोलत असतो... का? तर आम्ही इथे सुरक्षित आहोत. पण जो माणुस स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता २४ तास मरणाच्या दारात उभा असतो त्याच्याबद्दल कधीच सहानुभूति वाटत नाही. आज प्रत्येक अविचारी माणुस युद्धाची भाषा बोलत असतो पण बोलण्याइतके युद्ध करणे सोपे नाहि हे समजायला हवं त्यासाठि एकदा स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेउन बघा पुन्हा तुमच्या तोंडुन *युद्ध* हा शब्द बाहेर पडणार नाही. आज हल्ल्यात १८ मारलेत उद्या युद्धात १८०० मरतील त्याचे काय.. त्याना कुटुंब, प्रेमभावना नाहित..? त्यांच्या कुटुंबीयाना एक रक्कम जाहिर केली म्हणजे आपल्याला फार मोठे सत्कार्य केले असे वाटते......
भगवान बुद्धांनंतर जगाला अहिंसेचा आणि शांततेचा महान संदेश देणारी महात्मा गांधीजी नावाची एक व्यक्ति या देशात होउन गेली यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. भगवान बुद्धानी एक लाख मोलाचा संदेश दिलाय, *द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही त्यासाठि प्रेमच हवं.* सध्यातरी जगाला तारणहार ठरणा-या दोनच गोष्टी आहेत एक म्हणचे *अहिंसेचा मार्ग* आणि दुसरी म्हणजे *शांततेचा संदेश*...............
आपला हितचिंतक
निळकंठ शांताराम तांबे
९४०४७७२२००
nilakanthatambe.blogspot.com
जगाला युद्ध नको बुद्ध हवा...
.
काश्मीर येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाना *भावपूर्ण श्रद्धांजलि.* मानाचा मुजरा आणि सलाम त्यांच्या शौर्याला....
एकंदरीत या घटनेमुळे देशातील व सर्व राज्यातील वातावरण ढवळुन निघालेले आहे. गल्लीपासुन दील्लीपर्यंत चर्चा झाली आणि पुन्हा एकदा आमचे सर्वांचे देशप्रेम उफाळुन आले.
एरव्ही आम्ही एकमेकांवर कुरघोड्या करत असतो, जातीवाद करत असतो, पण त्या निमित्ताने दोन मिनटासाठि का होइना पण आमची देशभक्ति जागृत झाली. आम्ही भारतीय आहोत याची जाणीव झाली.
मग नेहमीप्रमाणे आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा *मुसलमान चलेजाव* चा नारा घुमु लागला. आणि 'पाक'भावना जागृत झाल्या..... घरबसल्या आम्ही देशभक्ति ची भाषा बोलु लागलो, पाकिस्तान ला शिव्या हासडत बसलो पण कुणालाही वाटलं नाही कि आपण हि स्वातंत्र्य सैनिक होउन देशासाठी प्राणार्पण करावं. नाहीं वाटणार, कारण मरणाला प्रत्येक जण घाबरतो *दुस-याचा प्राण गेला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे.* असंच प्रत्येकाला वाटत असते.
आराम खुर्चीत बसुन पाकिस्तान ला धडा शिकवण्याची गोळ्या घालण्याची भाषा आम्ही सहज बोलत असतो... का? तर आम्ही इथे सुरक्षित आहोत. पण जो माणुस स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता २४ तास मरणाच्या दारात उभा असतो त्याच्याबद्दल कधीच सहानुभूति वाटत नाही. आज प्रत्येक अविचारी माणुस युद्धाची भाषा बोलत असतो पण बोलण्याइतके युद्ध करणे सोपे नाहि हे समजायला हवं त्यासाठि एकदा स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेउन बघा पुन्हा तुमच्या तोंडुन *युद्ध* हा शब्द बाहेर पडणार नाही. आज हल्ल्यात १८ मारलेत उद्या युद्धात १८०० मरतील त्याचे काय.. त्याना कुटुंब, प्रेमभावना नाहित..? त्यांच्या कुटुंबीयाना एक रक्कम जाहिर केली म्हणजे आपल्याला फार मोठे सत्कार्य केले असे वाटते......
भगवान बुद्धांनंतर जगाला अहिंसेचा आणि शांततेचा महान संदेश देणारी महात्मा गांधीजी नावाची एक व्यक्ति या देशात होउन गेली यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. भगवान बुद्धानी एक लाख मोलाचा संदेश दिलाय, *द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही त्यासाठि प्रेमच हवं.* सध्यातरी जगाला तारणहार ठरणा-या दोनच गोष्टी आहेत एक म्हणचे *अहिंसेचा मार्ग* आणि दुसरी म्हणजे *शांततेचा संदेश*...............
आपला हितचिंतक
निळकंठ शांताराम तांबे
९४०४७७२२००
nilakanthatambe.blogspot.com
No comments:
Post a Comment